Tuesday, November 24, 2009
मुंबईच्या समुद्रात सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचा पहिला दगड रचण्याआधीच ते वादाच्या भोव-यात सापडले आहे. शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे. अन्यथा पुरंदरे यांच्यावर हल्ला करु, अशी धमकी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने दिली आहे. एवढेच नव्हे तर मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही दणका देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकाच्या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंग दाखवणारा लेझर शो असणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगांमध्ये कोणकोणत्या घटनांचा समावेश लेझर शोमध्ये करावा, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी शिवस्मारक समितीची बैठक बोलावली आहे. यावेळी शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात येणार आहे. बाबासाहेब पुरंदरे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असून, त्यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु मराठा महासंघाच्या धमकीमुळे आता या बैठकीत काय होणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ब्राह्मणीकरण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष राज्य सरकारने नेमलेल्या समितीने काढला आहे. परंतु आपल्या हयातीत पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव यांचे उदात्तीकरण करुन खोटा इतिहास लोकांना सांगितला. रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची एकदाही भेट झाली नव्हती. परंतु तरीही जणू काही हिंदवी स्वराज्याची प्रेरणा रामदास स्वामी यांनीच दिली, अशी समजूत ब्राह्मणी दृष्टिकोनातून पुरंदरे यांनी करुन दिली. त्यामुळे पुरंदरे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवावे. नाहीतर त्यांच्यावर हल्ला करु, अशी धमकी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर व संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकाच्या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंग दाखवणारा लेझर शो असणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगांमध्ये कोणकोणत्या घटनांचा समावेश लेझर शोमध्ये करावा, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी शिवस्मारक समितीची बैठक बोलावली आहे. यावेळी शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात येणार आहे. बाबासाहेब पुरंदरे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असून, त्यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु मराठा महासंघाच्या धमकीमुळे आता या बैठकीत काय होणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ब्राह्मणीकरण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष राज्य सरकारने नेमलेल्या समितीने काढला आहे. परंतु आपल्या हयातीत पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव यांचे उदात्तीकरण करुन खोटा इतिहास लोकांना सांगितला. रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची एकदाही भेट झाली नव्हती. परंतु तरीही जणू काही हिंदवी स्वराज्याची प्रेरणा रामदास स्वामी यांनीच दिली, अशी समजूत ब्राह्मणी दृष्टिकोनातून पुरंदरे यांनी करुन दिली. त्यामुळे पुरंदरे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवावे. नाहीतर त्यांच्यावर हल्ला करु, अशी धमकी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर व संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.
रायगडावर जेव्हा शिवपुतळा विराजतो...
7 Jun 2009, 0409 hrs IST
7 Jun 2009, 0409 hrs IST
ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या रायगडावरील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शनिवारी मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्य सरकार पुतळा बसवण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ, शिवप्रेमींनीच ६०० किलो वजनाचा ब्रॉन्झचा शिवरायांचा पुतळा बनवून त्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर हा पुतळा आता हलवला जाणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केल्याने शिवप्रेमींनी रायगडावरच एकच जल्लोष केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३६ व्या राज्याभिषेक सोहळ््याचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर केले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून १० ते १५ हजार शिवभक्त दाखल झाले होते. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी राजदरबारात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या पुतळ्याला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'गेल्यावषीर् सहा जून रोजी सरकारने मेघडंबरीत पुतळा बसवण्यास तत्वत: मान्यता दिली होती, मात्र वर्ष उलटूनही सरकार पुतळा बसवत नसल्याने लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे', असे संभाजीराजे यांनी सांगितले.
...
सरकार नमले
पुतळा हलवण्यासाठी शनिवार सायंकाळी ६ पर्यंतची मुदत शिवप्रेमींना देण्यात आली, मात्र मेघडंबरीत बसवलेला महाराजांचा पुतळा हलवणार नाही असा ठाम पवित्रा हजारो शिवप्रेमींनी घेतला. राष्ट्रवादीचे आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. आपण व संभाजीराजेंना सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चचेर्ला बोलावले असल्याचे ते जनसमुदायाला म्हणाले. शिवभक्त शांत होत नाहीत हे पाहताच 'आता शिवरायांचा पुतळा मेघडंबरीतून हलवला जाणार नाही', अशी ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३६ व्या राज्याभिषेक सोहळ््याचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर केले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून १० ते १५ हजार शिवभक्त दाखल झाले होते. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी राजदरबारात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या पुतळ्याला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'गेल्यावषीर् सहा जून रोजी सरकारने मेघडंबरीत पुतळा बसवण्यास तत्वत: मान्यता दिली होती, मात्र वर्ष उलटूनही सरकार पुतळा बसवत नसल्याने लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे', असे संभाजीराजे यांनी सांगितले.
...
सरकार नमले
पुतळा हलवण्यासाठी शनिवार सायंकाळी ६ पर्यंतची मुदत शिवप्रेमींना देण्यात आली, मात्र मेघडंबरीत बसवलेला महाराजांचा पुतळा हलवणार नाही असा ठाम पवित्रा हजारो शिवप्रेमींनी घेतला. राष्ट्रवादीचे आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. आपण व संभाजीराजेंना सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चचेर्ला बोलावले असल्याचे ते जनसमुदायाला म्हणाले. शिवभक्त शांत होत नाहीत हे पाहताच 'आता शिवरायांचा पुतळा मेघडंबरीतून हलवला जाणार नाही', अशी ग्वाही त्यांनी दिली.
Thursday, August 14, 2008
Subscribe to:
Posts (Atom)